आंदोलनाच्या आधीच ‘जेल’चा डेराव! दबाव तंत्राचा वापर, बच्चू कडूंचे खळबळजनक आरोप

आंदोलनाच्या आधीच ‘जेल’चा डेराव! दबाव तंत्राचा वापर, बच्चू कडूंचे खळबळजनक आरोप

Bachchu Kadu Allegations Pressure On Me Before Protest : आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, असा खळबळजनक आरोप बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला आहे. त्यांचा निशाणा नेमका कोणावर, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. बच्चू कडू यांनी 8 जूनपासून शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सात दिवस अन्नत्याग (Maharashtra Politics) उपोषण केलं. त्यांनी शनिवारी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. या प्रकरणी बच्चू कडूंनी सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 2 ऑक्टोबरपर्यंतची मुदत (Bachchu Kadu Protest) दिली आहे.

बच्चू कडूंचा खळबळजनक दावा

माध्यमांशी बोलताना आज बच्चू कडू यांनी म्हटलंय की, माझ्यावर आंदोलनाच्या आधीपासूनच दबाव तंत्राचा वापर केला जात आहे. माझ्या बँकेतील संचालकांकडून देखील मला सांगण्यात आलं होतं की, तुम्ही बोलू नका काही अडचणी निर्माण (Bachchu Kadu Hunger Strike) होईल. राज्याच्या मुख्य माणसाच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार भेटले. त्या ठिकाणी चर्चा झाली. बच्चू कडू यांचं काय मिळतं ते बघा. सप्टेंबरपर्यंत बच्चू कडू जेलमध्ये जातील, अशी व्यवस्था करा असा खळबळजनक दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

कुंडमळा पूल दुर्घटना : उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक, पुणे पोलिस अधीक्षक…

सप्टेंबरपर्यंत बच्चू कडू जेलमध्ये

तुम्ही तुमच्या लेव्हलवर काहीतरी शोधून काढा. प्रशासकीय लेव्हलवर स्वतः शोधून काढा. बच्चू कडू यांचा बंदोबस्त करता येईल, असे आदेश देण्यात आले होते. आता सुरुवात झाली, हे आम्हाला अपेक्षित आहे. हे राजकीय दृष्ट्या करतात, यात काही नवल नाही. ते आम्हाला अपेक्षित आहे, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. हे सर्व झाल्यावर आम्ही लढलो आणि टिकलो तर आमची परीक्षा आहे. आमचे सत्व तपासण्याचे दिवस येणार आहे. या संपूर्ण परीक्षेमधून उजळून आम्ही बाहेर निघू, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

शिर्डीत वाढदिवसाची ‘ब्लड पार्टी’! 42 वर्षीय व्यक्तीला लुटलं अन् वार करुन संपवलं, 7 अल्पवयीन मुलांचा प्रताप

काय म्हणाले बच्चू कडू?

कर्जमाफीच्या मागणीवर मी 90 टक्के यश मिळवलं आहे. दिव्यांगांच्या वीस मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. मी दोन ऑक्टोबरपर्यंत तारीख दिली आहे. मी तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र फिरणार आहे. 16 तारखेपासून पाणी त्याग आंदोलन करणार आहे, परंतु ते तुर्तास मागे घेतलं आहे. कर्ज वसुलीची सक्ती केल्यास बॅंक वाल्यांना गावात झाडाला बांधा. आत्महत्या करण्याची गरज नाही, असं देखील बच्चू कडूंनी शेतकरी बांधवांना सांगितलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube